कधी जायचा निघून विखार
कधी यायचे फुलून शिवार
नवी मागणी हरेक क्षणात
पुरे व्हायचा कुठून पगार
तुला पाहता उदास मनात
पुन्हा यायचे भरून विकार
तुला पाहता समोर क्षणात
पुन्हा जायचे पळून विचार
नवा डाव हा , जरी जन तेच
करा तोच ओरडून प्रचार !
--अदिती(१९ ऑक्टोबर २००६)
धनत्रयोदशी, शके १९२८
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें